Posts

Showing posts from April 17, 2022

कुंभमेळ्यात शाही स्नान म्हणजे काय असते?

Image
 कुंभमेळा (Kumbha Mela) आणि त्यानिमित्ताने तीर्थक्षेत्री शाही स्नानाला (Shahi Snan) साधु आखाड्यांमध्ये महत्वाचं स्थान आहे. कुंभमेळ्यात विविध आखाड्यांमधील साधुंना एखाद्या राजाप्रमाणे मान दिला जातो. हरिद्वार (Haridwar) येथे कुंभमेळ्याला नुकतीच सुरुवात झाली आहे. 11 मार्चला महाशिवरात्री निमित्ताने पहिलं शाही स्नान होत आहे. त्यानंतर होणाऱ्या 3 शाही स्नानांची तारीख आणि वेळ घोषित करण्यात आली आहे. पहिल्याच शाही स्नानावेळी साधुंमध्ये वादविवाद होऊ नये, शाही स्नान शांततामय वातावरणात पार पडावं यासाठी प्रत्येक आखाड्याला क्रम आणि स्नानची जागा नेमून दिली जाते. शाही स्नान म्हणजे काय? वैराग्य स्विकारलेल्या साधुंशी त्याचं नातं काय जाणून घ्या. शाही स्नान शतकानुशतके चालू आहे. यात 13 आखाडे (Aakhade) सहभागी होतात. ही कोणतीही वैदिक परंपरा नाही. या शाही स्नानाची सुरुवात 14 ते 16 शतकादरम्यान झाली असावी, असं मानलं जातं. या काळात मुघलांच्या आक्रमणाला सुरुवात झाली होती. धर्म आणि परंपरेचे मुघल आक्रमणांपासून संरक्षण होण्यासाठी हिंदू राज्यकर्ते आखाड्यातील साधूंची विशेषतः नागा साधूंची (Naga Sadhu) मदत घेत असत. नागा स

संजय राऊत, वर्षा राऊत आणि प्रवीण राऊत यांचेवर ED चा आवळला जाणारा फास - साध्या सोप्या भाषेत संपूर्ण परदाफाश

Image
 संजय राऊत, वर्षा राऊत आणि प्रवीण राऊत यांचेवर ED चा आवळला जाणारा फास - साध्या सोप्या भाषेत संपूर्ण परदाफाश इडी मागे लागण्यामागे किती मराठी माणसांची हाय आहे याची संपूर्ण कहाणी... ईडीने शिवसेना खासदार संजय राऊत यांचे फ्लॅट आणि जमीन जप्त केली आहे. एजन्सीने 1,034 कोटी रुपयांच्या पत्रा चाळ जमीन घोटाळ्याप्रकरणी शिवसेना नेते संजय राऊत यांची मालमत्ता जप्त केली आहे. या प्रकरणात शिवसेना नेते संजय राऊत यांचा अलिबागची जमीन आणि दादर आणि मुंबईतील प्रत्येकी एक फ्लॅट जप्त करण्यात आला आहे. संजय राऊत यांनी मात्र ईडीची ही कारवाई मध्यमवर्गीय मराठी माणसावर हल्ला असल्याचे सांगत अशा पावलांना घाबरणार नसल्याचे सांगितले. संजय राऊत असे ही बोंबलत आहेत की त्यांचा सगळा व्यवहार  2009 साल चा आहे आणि ED सूड बुद्धीने त्यांना त्रास देत आहे. काय आहे नेमके हे पत्रा चाळ प्रकरण? त्याचा संजय राऊत शी काय संबंध? जाणून घेऊया : *पत्राचाळ सुरवातीला ठक्कर नावाच्या विकासकाने 2008 साली विकसित करण्यासाठी घेतली.*  त्यात म्हाडा, ठक्कर आणि सोसायटी मध्ये ट्राय करार झाला. पत्रा चाळ परिसरातील बैठ्या घरांमध्ये राहात असलेल्या ६७२ कुटुंबीयां

मी बाबासाहेब पुरंदरे यांना कधीही भेटलो नाही - जेम्स लेन

Image
 मी बाबासाहेब पुरंदरे यांना कधीही भेटलो नाही - जेम्स लेन  James Laine Controversial Book :  राज्यात सध्या चर्चेत असलेल्या जेम्स लेन प्रकरणात आता मोठा खुलासा झालाय. हा खुलासा दुसरं तिसरं कुणी नाही तर स्वतः जेम्स लेन यांनी केलाय . इंडिया टुडेचे पत्रकार किरण तारे यांना ई मेलवरून दिलेल्या मुलाखतीत जेम्स लेनने बाबासाहेब पुरंदरे यांच्यासह  कोणीही त्यांना पुस्तक लिहिण्यासाठी माहिती दिली नाही असं म्हटलंय. त्याचबरोबर बाबासाहेब पुरंदरेंसोबत आपण कधीही चर्चा केली नसल्याचं जेम्स लेनने या मुलाखतीत म्हटलंय.  2003 साली प्रकाशित झालेल्या शिवाजी, हिंदू किंग इन इस्लामिक इंडिया या आपल्या पुस्तकाबद्दल जेम्स लेन यांनी मोठा खुलासा केलाय. इंडिया टुडेचे पत्रकार किरण तारे यांनी ई मेल मार्फत अमेरिकेत असलेल्या लेनशी संपर्क साधून त्यांचं या वादग्रस्त प्रकरणाबाबतच म्हणणं जाणून घेतलय . प्रश्न - छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल वादग्रस्त माहिती तुम्हाला कोणी पुरवली ? हा प्रश्नच मुळात चुकीच्या पद्धतीने विचारण्यात आलाय .  बाबासाहेब पुरंदरेच नव्हे तर हे पुस्तक लिहिण्यासाठी मला कोणीही माहिती पुरवलेली नाही.  माझं पुस्तक हे या

सरकारी इतिहासाकारांना उभे करून शिवचरित्रा वरून जाणीवपूर्वक घातलेला - राजाश्रय असलेला वाद

Image
 *सरकारी इतिहासाकारांना उभे करून शिवचरित्रा वरून जाणीवपूर्वक घातलेला - राजाश्रय असलेला वाद* छत्रपती शिवाजी महाराज. महाराष्ट्राच्या गौरवशाली इतिहासाचा सर्वात उत्तुंग महापुरुष. मध्यम युगात जेव्हा भारतावर मुघल लोकांचे साम्राज्य होते - अत्याचार होते, लाचारी होती, गुलामी होती तेव्हा "हे हिंदवी स्वराज व्हावे ही श्रींची इच्छा मी पूर्ण करणारच " असा पण करून ते सत्यात ज्याने उतरवले  ते आपले दैवत शिवाजी महाराज. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक शिवाजी महाराज. मुघल शत्रूला धूळ चारणारे शिवाजी महाराज. आदर्श राजा आणि आदर्श राज्य कसे असावे याचे जिवंत उदाहरणं म्हणजे शिवाजी महाराज. महाराष्ट्रात इतिहासकार नसलेल्यां दोन अशी व्यक्तीमत्वे होती ज्यातील एका व्यक्तीने शिवाजी जनमानसात पोचवला - बाबासाहेब पुरंदरे - तर दुसरी व्यक्ती दुर्दैवाने त्या विषयावर ज्याला "समग्र" म्हणता येईल असे लेखन करण्याआधीच निवर्तली - ते म्हणजे नरहर कुरंदकर. त्यांचे पुस्तक वाचले नसले तर अवश्य वाचा. बाबासाहेब पुरंदरे. यांनी शिवाजी महाराजांना एक राज्यकर्ता म्हणून पाहीले. त्यातील चमत्कार बाजूला ठेवले. त्यांचे कर्तुत्व, त्यां

श्रीलंकेवर अस्तित्वाचे संकट

Image
श्रीलंका-चारही बाजूने समुद्राने वेढलेला एक छोटासा देश. आपल्या पुराणात ‘सोन्याची लंका’ असा उल्लेख. म्हणजे एकेकाळी खूप श्रीमंत असा देश. आता कुणालाही आयुष्यात एकदा तरी तिथे जाऊन सुट्टी साजरी करावी असं वाटणारच.  जगभरातील प्रवासी तिथं येतात. प्रचंड निसर्गसौंदर्य. त्याच देशाच्या सैन्य दलातील एक अतिशय उच्च अधिकारी. राजकीय घराण्याचा वारसा लाभलेला. आपल्या दैदीप्यमान कामामुळे अनेक महत्त्वाचे पुरस्कार प्राप्त करतो. अतिशय हुशार. १९९८मध्ये अचानक स्वेच्छा निवृत्ती घेतो. माहिती तंत्रज्ञान मध्ये आपलं करिअर करायचं ठरवतो. आपला देश सोडतो. अमेरिकेत जातो. तेथेच रमतो. २००५ मध्ये आपल्या मोठ्या भावाच्या प्रचारासाठी परत आपल्या देशात येतो. भाऊ राष्ट्राध्यक्ष बनतो. आणि त्याला त्या देशाचे डिफेन्स सेक्रेटरी बनवले जाते. अतिशय महत्त्वाची जबाबदारी दिली जाते. संरक्षण व त्यासोबत नागरी विकास  अशी महत्त्वाची खाती त्याच्याकडे येतात.  दहा वर्षे तो तेथील अल्पसंख्यांक असलेल्या तमिळ लोकांची कत्तल करतो. तमिळ दहशदवाद नष्ट करतो. मानवी हक्कांचा नाश होतोय असे संपूर्ण जग बोलत असतं. पण तो बनतो तेथील बहुसंख्य लोकांचा मसीहा. त्याने के