Posts

Showing posts from March 11, 2018

ICE Contact.

Image
ICE Contact. Adopt this ice concept for your own benefit. Do it now on your mobile phones right now! The concept of ICE !!!!  THIS IS VERY IMPORTANT. We all carry our mobile phones with names & numbers stored in its memory but nobody, other than ourselves, knows which of these numbers belong to our closest family or friends. If we were to be involved in an accident or were taken ill, the people attending us would have our mobile phone but wouldn't know who to call. Yes, there are hundreds of numbers stored but which one is the contact person in case of an emergency? Hence this "ICE" (In Case of Emergency) Campaign The concept of "ICE" is catching on quickly. It is a method of contact during emergency situations. As cell phones are carried by the majority of the population, all you need to do is store the number of a contact person or persons who should be contacted during emergency under the name "ICE" ( In Case Of Emergency). The idea

शेतकरी मोर्चा यशस्वी?

Image
शेतकरी मोर्चा यशस्वी? मागण्या मान्य? काय होत्या मागण्या? शेतमालाला योग्य दर मिळाला पाहिजे. पाणी टंचाई वर तोडगा काढला पाहिजे. शेतमालाला योग्य दर का मिळत नाही? APMC च्या दलालांमुळे. जे रू.2/- प्रति किलो भावाने शेतकर्यांकडून माल विकत घेतात आणि शहरात रू 50/- प्रति किलो ने विकतात. पाणी टंचाई का निर्माण होते? कारण पाणी हे राजकीय पुढार्यांच्या द्राक्षाच्या मळ्यात आणि Wineries कडे वळवले जाते. मोर्चात कोण सहभागी होते? शेतकरी व आदिवासी. मोर्चा कोणी आयोजित केला होता? महाराष्ट्र कम्युनिस्ट पक्षाने..(CPI). CPI कडे एवढा मोठा मोर्चा काढण्यासाठी लागणारे आर्थिक पाठबळ आहे का? उत्तर : नाही. मग हे पाठबळ कोणी दिले? हे पाठबळ दिले त्या राजकीय पक्षाने ज्याचा ताब्यात APMC आहेत व ज्यांच्या पुढार्यांच्या द्राक्षाच्या बागा व मळे आणि wineries आहेत ज्याच्या साठी तेथील पाणी वळवले जाते. मग मोर्चा मुळे शेतकऱ्यांना वाढीव भाव मिळाला काय? पाणी टंचाई वर तोडगा निघाला काय? उत्तर: नाही....कारण? कारण, सरकार शी शेतकरी संघटनेच्या शिष्टमंडळाने ज्या ९ मुद्दयावर चर्चा केली त्यात वरील दोन मुद्दे नव्हतेच. आदिवासी व ग

करताय कम्युनिस्टाना एक्स्पोज ...?

Image
शेतकरी मोर्चा कव्हर करणार्या तमाम टी आर पी भुक्त पत्रकारांनो ... जरा आजच्या लाल बावटा पुरस्कृत तथाकथीत शेतकरी मोर्चावर कव्हर स्टोरी बनवा . नेत्यांच्या मुलाखती घेण्यापेक्षा सामान्य मोर्चेक्र्यांशी बोला .. विचारा .. कुठुन आलात ..? ( बरेचसे पालघर जिल्ह्यातील वाडा मोखाडा जव्हार , धुळे नंदुरबार येथील सातपुड्याच्या डोंगरातील आदिवासी पाड्यांवरुन आलेले असतील,) मोर्चा नाशिक हुन निघालाय तेव्हा नाशिक परिसरातील खरीपाचे रब्बीचे ,बागायतदार शेतकरी कीती ..? हे पण तपासुन पहा ) विचारा .. शेती कीती आहे .? (शेती नाही ,लेबर कॉंट्रॅक्टर च्या मागे मीळेल ती मजुरी करणारे बहुसंख्य असतील ,ह्या पैकी काहीजण वनजमीनीवरील झाडे तोडुन नागली ,नाचणीचं मर्यादीत पिक घेतात . म्हणुन शेतकरी ) विचारा .. कोणते पिक घेता .? (नागली नाचणी ) कीती कर्ज घेतलं ...? (आमाला कोणी कर्जच नाय द्येत ) विचारा .. उदरनिर्वाहासाठी आणखी काय करता ..? मुकादमाबरोबर मजुरीला जातो लाल सलाम कधीपासुन आणि का करता ..? (आमचा बाप आणि माय करायची तवापासुन ..) विचारा ... इथे येण्यासाठी कीती रुपये मीळाले ..? (दोन व

मुख्यमंत्र्यांचा मास्टरस्ट्रोक !

Image
मुख्यमंत्र्यांचा मास्टरस्ट्रोक ! राजकारण हा शक्यतांचा खेळ आहे, (Politics is the art of the possible) असं म्हटलं जातं. ठोकळेबाज, चाकोरीबद्ध विचार केल्यास भिंतीवर डोकं आपटण्यापेक्षा हाती काहीही लागत नाही. याउलट विविध शक्यतांचा विचार करून सर्वोत्तम पर्याय निवडल्यास आपण भिंत कशी आणि कधी पार केली याचा कोणाला पत्ताही लागत नाही ! महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वशैलीत याचा प्रत्यय नेहमीच येतो. खरंतर नरेंद्र मोदी यांच्यानंतर इतक्या प्रचंड आव्हानांचा सामना करा वा लागलेला मुख्यमंत्री म्हणून फडणवीस यांचाच उल्लेख करावा लागेल आणि मोदींप्रमाणेच त्यानी अत्यंत चतुराईने आणि धोरणीपणाने शक्यतांचा खेळ करून विरोधकांवर बाजी उलटवली आहे आणि आव्हानांवर मात केली आहे. संपूर्ण बहुमत नसताना सरकार स्थापन करणं हे पहिलं आव्हान. तेव्हा राष्ट्रवादीच्या पाठिंब्याच्या ‘शक्यतेने’ शिवसेनेला सरकारमध्ये सामील होणं भाग पाडलं. त्यानंतर सरकारमध्ये राहूनही उभा दावा मांडणारी शिवसेना, ‘फडणवीसांना हरवणे’ हा एककलमी कार्यक्रम असलेले विरोधक, शेतकरी कर्जमाफी, मराठा मोर्चे यासारख्या अजस्त्र आव्हानांना

राजकीय हेतूने काढलेला मोर्चा

Image
 विधानसभेत अजित पवार यांच्या प्रश्नाला उत्तर देताना मुख्यमंत्री स्पष्टपणे म्हणाले की आम्ही हा मोर्चा आणि लोकांची पायपीट टाळण्यासाठी नाशिकमधे बैठक घ्यायला तयार होतो तथापि मोर्चाच्या आयोजकानी याला नकार देवून मुंबईत मोर्चा आणणारच असे सांगितले . यावरुन हे स्पष्ट आहे की स्वत:ची nuisance value दाखवण्याकरिता या गरिबाना फसवले गेले .  याचाच अर्थ राजकीय हेतूने काढलेला मोर्चा आणि त्याचा आर्थिक ताळेबंद लोकांच्या डोळ्यावर येणारच .  जर तुम्हाला तुमच्या ठिकाणी येवून बैठक घ्यायची तयारी सरकारने दाखवली होती तर अस का वागलात . संपूर्ण कर्जमाफी हे जोडलेल सप्लिमेंट होत . जे आदिवासी आले होते त्यांच्या मागण्या वेगळ्याच होत्या ज्या की मान्यही केल्या गेल्या . कशाला या आदिवासींची झुंड बनवून ताकत दाखवलीत हेतू काय ?? मोर्च्यात प्रत्येक मिडियाला बाईट देताना मोर्चेकरी छातीवर गोळ्या झाडल्या तरी मागे फिरणार नाही अस पढवल्या सारख का बोलत होता ? मुळात गोळीबार करावा असा ताण कुठेही नसताना ही वक्तव्य का ?  कारण मोर्चा sponsored होता ... मग हिशेब विचारला तर राग यायच काय कारण कारण आहे . आता राहिला त्या आदिवासींच्या पायाला झा

Kisan Morcha

Image
25000 हजार माणसांना नाशिक ते मुंबई 6 दिवस पायपीट करीत आणायचे. त्यांचे दोन वेळा जेवण, 2 वेळा चहा - पाव, पाणी, वाटेत रोज रात्री चा थांबा , गाड्यांचा ताफा, त्यांचे डिझेल - एवढा सारा खर्च किमान एक कोटी रुपयांच्या घरात जाईल.. कोण करतोय एवढा खर्च? IT, ED ने तपास करावा.. ------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------ 4 वर्षात जेवढे मोर्चे निघाले, 60 वर्षात कधी निघाले नाही, याचा अर्थ... विरोधकांना खरचं काम धंदा उरला नाही. व "भाजपा सरकार कामगिरी दमदार" -------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------