Posts

Showing posts from May 29, 2016

Last local...

शेवटची लोकल निघते सीएसटीवरून 12. 37 ला. आणि शेवटची पोहोचणारी लोकल असते 1. 38 ची. 12 वाजून 37 मिनीटांनी निघालेली लोकल तीन च्या दरम्यान पोहोचते कर्जत ला. तिथून ती रिटर्न निघते साधारण साडे चारला. मधल्या काळात मोटरमन आणि गार्ड आराम करतात ते त्यांच्यासाठी खास बनवलेल्या रेस्ट रुम मध्ये. तसं प्रत्येक मोटरमन आणि लोकल गार्ड यांच्यासाठी ड्युटी अवर्स असतात फक्त चार तास. हे चार तास ट्रेनच्या रनिंग टाईमनुसार मोजले जातात. त्यात ट्रेन कुठे किती वेळ थांबली वगैरे ग्राह्य धरलं जात नाही. पण त्या चार तासात पूर्ण वेळ डोळ्यात तेल घालून एकटक एका नजरेनं एका दिशेत पाहत राहणं, योग्य अंतरावर प्रॉपर नोटिफिकेशन देणं, दर चारशे मीटरवर येणाऱ्या सिग्नलला तपासणं शिवाय प्रत्येक स्पीड इंडिकेटरवर लक्ष ठेऊन स्पीड मेंटेन करणं अतिशय महत्त्वाचं असतं. रात्रीच्या वेळेस हे काम फार जिकीरीचं असतं. जर स्पीड 40 ऐवजी 42 वर जरी गेला तरी मोटरमन आणि गार्ड यांना कंट्रोल रुमकडून ताकीद जाते. ड्युटी संपल्यावर त्याचं लेखी कारण द्यावं लागतं. एखाद्या वेळेस मोटरमन कडून सिग्नल असताना जरी ट्रेन क्रॉस केली गेली तर अवघ्या पाचशे मीटर अंतर पुढे गे

कँप्टन जिंकला.....कँप्टन हरला...

कँप्टन जिंकला.....कँप्टन हरला... आयपीएल यंदा हैद्राबाद संघाने पटकावले. बेंगलोर संघाला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले . गेल..डिव्हिलीयर्स..वँटसन...विराट कोहली या दिग्गज खेळाडूचा बेंगलोर संघ विजयासाठी बहुतांशी फेव्हरीट होता . तरीही डेव्हिड वाँर्नर या जिगरबाज खेळाडूच्या नेतृत्वाखाली हैद्राबाद संघाने बेंगलोरला नमवत इतिहास रचला. आयपीएलमध्ये विराट कोहली हा प्रतिभावान खेळाडू पुन्हा एकदा आपल्या अंगभूत तेजाने तळपला. सुरूवातीला पराभव येऊनही संघाला फायनल गाठून देण्यात सिंहाचा वाटा विराटचा होता . तरीही या खेळाडूला अंतिम सामन्यात अपयश आले तेव्हा त्याच्या नेतृत्व करण्याची पद्धती पुन्हा नव्याने तपासायला हवी. कारण उद्या भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार म्हणून विराटकडे पाहिल जातय. नेतृत्व करणाऱ्या खेळाडूने स्वतःला सिद्ध कराव लागते हे खरे . विराटने स्वतःला यैध्दा म्हणून सिद्ध केलय यात वाद नाहीय . पण...पण एकट्या सेनापतीच्या पराक्रमावर युद्ध जिंकता येत नाही हे सत्य आहे. आपल्या सहकारी खेळाडूना प्रोत्साहीत करणे..त्यांच्याकडून चांगली कामगिरी करवून घेणे...त्यांच्यातील बलस्थाने शोधून त्यांना मार्गदर

५० कोटी डॉलर्सचा – चाबहार करार : भारताचं चीन-पाक युतीला उत्तर

५० कोटी डॉलर्सचा – चाबहार करार : भारताचं चीन-पाक युतीला उत्तर चीन आणि पाकिस्तानची भारतविरोधी कपटी युती सर्वश्रुत आहे. भारताला सर्व बाजूनी घेरण्यासाठी योजलेली “स्ट्रिंग ऑफ पर्ल्स” योजना असोत वा काश्मीरमधील पाक-पुरस्कृत कुरापातीना दिलेला आधार असो – चीन ने भारताला शक्य त्या सर्व प्रकारे घेरण्याचा प्रयत्न केला आहे. चीनच्या ह्या रणनीतीवर भारताने दिलेल्या काही उत्कृष्ट प्रत्युत्तरांपैकी एक आहे – नुकताच झालेला – चाबहार करार. हा करार “जलद गतीने” पूर्ततेकडे सरकावा ह्यासाठी सुषमा स्वराजजींनी इराण भेटीत विशेष प्रयत्न केले होते. त्याचीच परिणीती म्हणून नरेंद्र मोदींच्या इराण दौऱ्यात ह्या करारावर शिक्कामोर्तब झालं. नेमका काय आहे चाबहार करार ? सुषमा स्वराज ह्यांच्या तेहरान दौऱ्यात इराण आणि अफगाणिस्तान ह्यांनी चाबहार कराराच्या जलद पूर्ततेबद्दल हमी दिली गेली, आणि मोदींच्या दौऱ्यात त्यावर स्वाक्षरी झाली. ह्या करारानुसार चाबहार इथे भारत एक मोठं बंदर विकसित करणार आहे. भारत – अफगाणिस्तान व्यापारी संबंध दृढ होण्याच्या दिशेने ही मोठी झेप असेल. स्त्रोत भारतासाठी हे बंदर लवकरात लवकर तयार होणं अनेक क