राजकीय हेतूने काढलेला मोर्चा

 विधानसभेत अजित पवार यांच्या प्रश्नाला उत्तर देताना मुख्यमंत्री स्पष्टपणे म्हणाले की आम्ही हा मोर्चा आणि लोकांची पायपीट टाळण्यासाठी नाशिकमधे बैठक घ्यायला तयार होतो तथापि मोर्चाच्या आयोजकानी याला नकार देवून मुंबईत मोर्चा आणणारच असे सांगितले .
यावरुन हे स्पष्ट आहे की स्वत:ची nuisance value दाखवण्याकरिता या गरिबाना फसवले गेले . 
याचाच अर्थ राजकीय हेतूने काढलेला मोर्चा आणि त्याचा आर्थिक ताळेबंद लोकांच्या डोळ्यावर येणारच . 
जर तुम्हाला तुमच्या ठिकाणी येवून बैठक घ्यायची तयारी सरकारने दाखवली होती तर अस का वागलात .
संपूर्ण कर्जमाफी हे जोडलेल सप्लिमेंट होत . जे आदिवासी आले होते त्यांच्या मागण्या वेगळ्याच होत्या ज्या की मान्यही केल्या गेल्या .
कशाला या आदिवासींची झुंड बनवून ताकत दाखवलीत हेतू काय ??
मोर्च्यात प्रत्येक मिडियाला बाईट देताना मोर्चेकरी छातीवर गोळ्या झाडल्या तरी मागे फिरणार नाही अस पढवल्या सारख का बोलत होता ?
मुळात गोळीबार करावा असा ताण कुठेही नसताना ही वक्तव्य का ? 
कारण मोर्चा sponsored होता ...
मग हिशेब विचारला तर राग यायच काय कारण कारण आहे .
आता राहिला त्या आदिवासींच्या पायाला झालेले त्रास उन वगैरे ...
आरे किती दिवस हे लोक स्वत:ला या राजकारण्याच्या हातातल बाहुल बनवून खेळवून घेणार आहेत ....
ते थांबवा ... 
त्याना योग्य मार्ग दाखवा ना ....

Comments

Popular posts from this blog

The Vanjari caste

शेतजमीन विषयक वहिवाट रस्ता

5 +3+3+4 school system explained