*हिंदू दहशतवादाची भाकडकथा*

*जागता पहारा--------भाऊ तोरसेकर*

जेव्हा दाऊदला मुंबईचा सामान्य माणूस ओळखतही नव्हता आणि गँगवॉर हा शब्दही प्रचलित झाला नव्हतातेव्हा एक खतरनाक गुन्हेगार दिल्लीच्या तिहार तुरुंगातून फरारी झालेला होतादेशभरातील लोकांच्या तोंडी त्याचे नाव होतेचार्ल्स शोभराज हाच तो माणूसतिहारच्या रखवालदारांना गुंगी आणणारे काहीतरी खाऊ घालूनहा कैदी सहीसलामत निसटला होतामग त्याला शोधून काढण्याचे  ताब्यात घेण्याचे मोठे नाटय रंगले होतेज्यांनी त्याला सर्वप्रथम शिताफीने पकडले होतेत्याच एका ज्येष्ठ पोलीस अधिकाऱ्यावर हीकामगिरी सोपवली गेलीत्याचे नाव होते मधुकर झेंडेत्यांनीच मग सापळा लावून शोभराजला गोव्यात अटक केली होतीअसा चार्ल्स शोभराज याने केलेले विधान महत्त्वाचे आहे - 'आपण 30-35 देशात गुन्हे केले आहेतपण कुठलेच पोलीस आपल्याला गजाआड टाकूशकले नाहीतभारतातच आपण फसलोकारण इथे खोटे पुरावे बनवण्याची कायदेशीर तरतूद आहे आणि न्यायालयातही खोटे पुरावे खरे सिध्द करण्याची कायदेशीर मुभा आहे.' आज मालेगावच्या स्फोट प्रकरणातून दीर्घकाळ अकारण तुरुंगवास सहन करून मुक्तझालेल्या साध्वी प्रज्ञासिंग यांच्या बाबतीत *शरद पवार यांनी व्यक्त केलेले मत ऐकल्यावरमला त्या चार्ल्स शोभराजची आठवण झाली.* कारण त्याचाच मुद्दा नव्याने पुढे आलेला आहेइतकी वर्षे ज्यांना हिंदू दहशतवादी म्हणून गजाआड डांबण्यात आले  जामिनाचीसंधीही नाकारली गेलीत्यांच्या विरोधात कुठले पुरावे होते आणि कशासाठी त्यांना डांबण्यात आलेत्याचा खुलासा कोणीही करीत नाहीपण त्यांच्या सुटकेविषयी मात्र अश्रू ढाळले जात आहेत. *शरद पवार दीर्घकाळ प्रशासकीय जबाबदाऱ्या पार पाडलेले राजकारणी आहेतआणि त्यांना असे हवेत बोलून भागणार नाही.* सर्वोच्च न्यायालयाकडून या प्रकरणाची छाननी करण्याची मागणी करूनही त्यांना हात झटकता येणार नाहीतकारण याची सुरुवातच मुळात *पवारांच्या एका विधानापासून झाली होती.*



मालेगावचा स्फोट झाल्यानंतर, *अलिबाग येथे पवारांच्या राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षाचे चिंतन शिबिर भरले होते.* तिथे त्यांनी मालेगावचा उल्लेख करून एक मत व्यक्त केले होते. *कुठेही स्फोट वा घातपात झाल्यावर एकाच धर्माचे लोक पकडले जातातदुसऱ्या कुणाकडेसंशयानेही बघितले जात नाहीही बाब गंभीर असल्याचे पवार म्हणाले होते.* त्यानंतर त्या स्फोटाच्या तपासाची दिशाच बदलून गेलेली होतीसंशयित म्हणून दहशतवादविरोधी पथकाने (एटीएसनेआधी काही मुस्लीम तरुणांना पकडलेले होतेमात्र *पवार बोलले आणिनवे एटीएस प्रमुख हेमंत करकरे यांनी नव्या दिशेने तपास सुरू केला.* त्यात त्यांना मालेगावात हिंदू दहशतवाद्यांनी घातपात केल्याचा शोध लागलात्यानुसार धरपकड सुरू झालीत्याच संदर्भात *पवारांचे एक विधान आणखी शंकास्पद आहेशुक्रवारी मुस्लिमांचा पवित्रदिवस असतोआणि अशा वेळी कोणी मुस्लीम घातपात वा हिंसा करणार नाहीतथोडक्यात हा *सगळा तपास पवारांच्या एका गृहीतावर झालेला होता.* ते गृहीत सिध्द करण्यासाठी पुरावे आणि आरोपी शोधण्याचे कष्ट करकरे यांनी घेतलेअसे म्हणता येईलत्यालाहीहरकत असायचे कारण नाहीपण करकरे यांचा तपास योग्य दिशेने चालला होता आणि खरेच आरोपी त्यात पकडलेले होतेतर त्याच्याही आधी ज्या मुस्लीम तरुणांना त्याच गुन्ह्यातले आरोपी म्हणून अटक झाली होतीत्यांनाही दीर्घकाळ कोठडीत कशाला डांबून ठेवलेहोतेकर्नल पुरोहित वा साध्वी प्रज्ञा हेच खरे आरोपी असतीलतर आधी पकडलेल्या मुस्लीम तरुणांची विनाविलंब मुक्तता व्हायला हवी होतीपण तसे केव्हाही घडले नाहीएकाच वेळी दोन भिन्न दिशांनी झालेल्या तपासातील आरोपी गजाआड पडलेले होतेम्हणजेमहाराष्ट्रातलेच पोलीस मालेगावला मुस्लीम जिहादचा गुन्हा ठरवत होते आणि हिंदू घातपाती म्हणून इतरांनाही गजाआड डांबून ठेवत होतेह्या विरोधाभासाचे काय? *पवारांनी प्रज्ञासिंग यांच्या मुक्तीबद्दल शंका घ्यायला हरकत नाही.* पण तसा त्यांना विश्वासच असेलतर आधीच पकडलेल्या मुस्लीम तरुणांना विनाकारण तुरुंगात ठेवल्याबद्दल यापूर्वी कधीच कशाला बोलले नाहीतकरकरे यांचा तपास योग्य दिशेने जाणारा होतातर *आधीच्या चुकलेल्या तपासातील संशयितांच्या सुटकेसाठी पवारांनी काय केले?*



शोभराज म्हणतोतसा सगळा प्रकारच बिनबुडाचा असलातर दुसरे काय व्हायचे? *पवारांना अलिबागच्या चिंतन शिबिरात जो साक्षात्कार झालाहोतातिथून मालेगावच्या तपासाला वेगळी दिशा मिळाली  आरोपीही ताब्यात घेतले गेले. *पण त्याच साक्षात्काराला खरेठरवण्यासाठी आवश्यक असलेले पुरावे कुठून आणायचेही समस्या होती आणि तिचे उत्तर पवारांपाशी नव्हते की करकरे यांच्याकडेही नव्हते.* म्हणून तर तपास दिशाहीन झाल्यावर आधी मोक्काचा वापर करण्यात आलामोक्का कायदा हा दहशतवाद्यांसाठी नसूनसंघटित गुन्हेगारीसाठी बनवला गेलेला आहेत्यामध्ये टाडाच्या अनेक तरतुदी आहेतकुणालाही विनाजामीन दीर्घकाळ आत ठेवायचे असेलतर मोक्का हे उत्तम हत्यार आहेम्हणूनच पुरोहित  साध्वी यांना मोक्का लावला गेलापुरावे सादर करून अटकेवरशिक्कामोर्तब करण्याची मुदत संपत आली असतानाअकस्मात या आरोपींना मोक्का लावला गेलातोच करकरे यांच्या तपासातील सर्वात दुबळा दुवा आहेपुरावे असते तर मोक्काचा आडोसा घ्यावा लागला नसताकी दीर्घकाळ खटला चालवण्यात कालापव्यय करण्याचीपळवाट शोधावी लागली नसतीपण तसे करावे लागलेकारण ज्या गोष्टी *पवारांना किंवा राजकारणाच्या चिखलफेकीला पुरावे म्हणून वापरता येतातत्याच्या आधारे न्यायालये निकाल देत नसतात.* तिथे विवेकाच्या  न्यायाच्या कसोटीवर टिकणारे पुरावे आवश्यकअसतातत्याचाच दुष्काळ असल्यावर कुठल्या कोर्टात पवार-करकरे यांचा शोध टिकणार होतापुरोहित यांच्या घरात आरडीएक्स सापडण्यापासून त्यांनी लष्करी छावणीतून ते स्फोटक मिळवल्यापर्यंत तमाम गोष्टी बिनबुडाच्या होत्यात्या खरोखर असत्यातर याखटल्याला सात वर्षे विलंब झाला नसता की आज पुरावेच नाहीत म्हणायची नामुश्की राष्ट्रीय तपास यंत्रणेवर आली नसतीअर्थात सरकार बदलले असल्याने हे पुरावे होते आणि आता ते पुरावे नष्ट केलेअसाही आरोप होऊ शकतोपण पुरावे होते तर ते कोणापाशी होतेआणि वेळीच कोर्टात कशाला पेश केले नाहीतयाचेही उत्तर द्यावे लागेलकोर्टाच्या कब्जात असलेले पुरावे सरकार नष्ट करू शकणार नाहीमग हे इतके भक्कम पुरावे कोर्टापासून का लपवून ठेवण्यात आलेत्याचाही खुलासा व्हायला पाहिजेकेवळ करकरे कसाबकडूनमारले गेलेम्हणून त्यांनी केलेल्या विधानांना पुरावा मानता येणार नाहीत्यांचे हौतात्म्य ही वेगळी गोष्ट आहे आणि त्यांनी केलेले काम वेगळी बाब आहेइथे त्याची गल्लत व्हायचे कारण नाहीपण एकूण *मालेगाव प्रकरणाला हिंदू दहशतवाद ठरवण्याचा जो तमाशामागली साडेसात वर्षे चाललात्याचा खरेखोटेपणा तपासून बघण्याचीही गरज आहे.*


हे प्रकरण कोर्टात गेले आणि मोक्का कोर्टानेच त्या गृहीताला दणका दिलाकिमान दोन गुन्हे दाखल असल्याखेरीज मोक्का लावता येत नाहीम्हणून पुरोहित साध्वी यांच्यावरील मोक्का उठवण्याचा आदेश कोर्टाने दिला होतातेव्हा त्यांना विनाविलंब जामीन द्यावालागला असताम्हणून मोक्का कायम राखण्यासाठी पुढली कसरत सुरू झालीत्यासाठी मग ह्या 'हिंदूदहशतवाद्यांना आणखी कुठल्या गुन्ह्यांत घातपातामध्ये गुंतवता येतेत्याचा शोध सुरू झालातेव्हा समझोता एक्स्प्रेसमक्का मशीद स्फोटअजमेर दर्गा स्फोटअशा एकामागून एक आरोपात हेच आरोपी असल्याचा शोध लावला गेलात्यातही कोणाला पुराव्याची गरज भासली नाहीसमझोता प्रकरणाचा तर तपास पूर्ण होऊन त्यात सिमीच्या माजी नेत्याने आपला गुन्हा मान्य केला होतातरीही त्याच आरोपपत्रात पुरोहित यांचेनाव घुसडले गेलेत्यामध्ये नुसत्या नावाखेरीज अन्य काही संदर्भ नसल्याचे आता सांगितले जाते आहेइतकी वर्षे समझोता आरोपपत्रात ज्याचे नाव घातलेत्याच्या विरोधातला पुरावा कशाला जोडला गेला नाहीतीच कहाणी अजमेर  मक्का मशिदीच्या बाबतीतलीआहेनुसती आरोपपत्रात नावे घालायची आणि आरोपांची राळ उडवायचीतपास चालल्याचे दावे करायचेबाकी शून्यआज तपास यंत्रणाच म्हणतेकी पुरोहितच्या घरामध्ये आरडीएक्स पोलिसांनीच दडवून ठेवले होते आणि ते तिथे कुठून आणलेत्याबाबतीत कुठलीहीनेमकी माहिती नाहीलष्करात कुठेही हे स्फोटक वापरले जात नाही आणि पुरोहित यांना तर त्याची माहितीही असण्याचे कारण नाहीपुरोहित यांनीच काहींना घातपाताचे  बाँब बनवण्याचेशस्त्रास्त्रे हाताळण्याचे प्रशिक्षण दिल्याचा आरोप आहेपण पुरोहित हे लष्करीगुप्तचर विभागात काम करीत होते आणि त्यांना स्फोटकाचे प्रशिक्षणच दिले जात नाहीमग जो त्यातले काही शिकलाच नाहीतो इतरांना त्याचे प्रशिक्षण कसे देणारएकूणच सगळा मामला कपोलकल्पित होता आणि कोर्टाच्या छाननीत त्याची लक्तरे उघडकीस येऊनयेतम्हणून मोक्काचा हत्यारासारखा वापर झाला.

अर्थात हा मामला केवळ मालेगावपुरता नव्हता किंवा नसावाभारतात हिंदू दहशतवाद फोफावतो आहे आणि *जिहादींपेक्षा भारताला हिंदूंच्या हिंसक प्रवृत्तीचा धोकामोठा असल्याचे विधान *राहुल गांधी यांनी अमेरिकन राजदूताशी बोलताना स्पष्ट केले होते.* मग त्यालापुष्टी देणारे पुरावे निर्माण करण्याचा उद्योग सुरू झालात्यातूनच मग कुठल्याही मुस्लीम वस्तीतल्या घातपाताचा किंवा हिंसेचा संदर्भ घेऊन हिंदू दहशतवाद अशी भाषा सेक्युलर माध्यमातून सुरू झाली. *भारतात मुस्लीम वस्त्यांमध्ये दडी मारून बसलेल्या जिहादीवृत्तीला संरक्षण देण्याचे जे सरकारी धोरण यू.पी..च्या कारकिर्दीत स्वीकारले गेले,* त्याचे मालेगाव हे एक उपकथानक आहेइशरत चकमकही त्याचेच एक उपकथानक आहे. *गुजरात दंगलीवरून जगाच्या व्यासपीठावर माजवण्यात आलेले काहूर,* ही त्याची एकूणपटकथा आहे. *म्हणूनच इशरत प्रकरणात यू.पी..चे गृहमंत्री शिवराज पाटील यांनी ती तोयबाची हस्तक असल्याचे संसदेत सांगितले होते.* मालेगाव प्रकरणात राष्ट्रवादीचे *गृहमंत्री आबा पाटील यांनीच मुस्लीम संशयितांना अटककेल्यावर आपली पाठ थोपटून घेतलीहोती. *काँग्रेसच्याच हरयाणा सरकारनेसमझोता एक्स्प्रेसच्या तपासात *मुस्लीम जिहादी सिमीचेहस्तक असल्याचा निर्वाळा दिला होतापण *राहुल गांधींनी हिंदू दहशतवादाचा शोध लावलाआणि मग एकेका जुन्या प्रकरणातल्या हिंदू दहशतवादाचे धागेदोरे नव्यानेशोधणे सुरू झालेत्यासाठी सरकारी यंत्रणेला  तपास पथकांना कामाला जुंपले गेलेज्यांचे सहकार्य त्यात मिळाले नाही वा ज्यांनी खोटेपणा करण्यास नकार दिलाअशा यंत्रणांना  अधिकाऱ्यांनाही मग त्यातले गुन्हेगार ठरवण्यापर्यंत मजल गेलीआणि अर्थातच हे सर्वसेक्युलर भूमिकेतून जनहितासाठी केलेले असणारहे आपण समजून घेतले पाहिजे. *जनहितार्थ आपण कितीही धडधडीत खोटे बोलू शकतो  लोकांची दिशाभूल करू शकतोअसे शरद पवार यांनी यापूर्वीच मान्य केले आहेम्हणूनच मालेगावच्या स्फ़ोटात हिंदू दहशतवादअसल्याचे त्यांनी खोटेच बोलले असणारयाविषयी खात्री बाळगायला हरकत नसावीत्यात पवारांचा हातखंडा आहे ना?* 

1993 सालात मुंबई पहिल्यांदा स्फोटमालिकेने हादरलीत्या दिवशी संध्याकाळी मुंबईकरांना दिलासा देण्यासाठी मुख्यमंत्री शरद पवार दूरदर्शन कॅमेऱ्यासमोर येऊन बसले आणि त्यांनी आपल्या जनतेला विश्वासात घेऊन धडधडीत खोटी माहिती सादर केलीमुंबईत एकूणअकरा स्फोट झाले होतेपण पवारांनी बारा स्फोट झाल्याचा दावा आपल्या भाषणात केलामशीद बंदर येथे तो बारावा स्फोट झाल्याचे त्यांनी सांगून टाकले होतेतमाम अकरा स्फोट बिगर मुस्लीम वस्तीत वा हिंदू वर्दळीच्या जागी घडले होतेत्यामुळे मुस्लिमांविषयीजनमानसात संशय निर्माण होईलअशी त्यांना शंका होतीम्हणून मुस्लीम दाट वस्तीतही स्फोट झाल्याची धडधडीत खोटी माहिती पवार यांनी दूरदर्शनवर बोलताना दिलीइतक्या संकटप्रसंगी *महाराष्ट्राचा मुख्यमंत्री म्हणून पवार खोटे बोलत असतीलतर अन्य प्रसंगीराजकीय हेतू साधण्यासाठी पवार किती खोटे बोलू शकतीलत्याचा नुसता अंदाज केला तरी पुरे!* मालेगावचा स्फोट मुस्लिमांनी घडवला नाहीहे सिध्द करायला असे पवार कुठल्या थराला जातीलमालेगावचा हिंदू दहशतवादी हल्ला कुठे शिजलात्याचा हा पुरावा आहेएकदा सरकारने वा त्याच्या सूत्रधाराने त्यात हिंदू दहशतवाद असल्याचे ठरवले आणि त्यालाच पुष्टी देण्याचे काम करकरे यांच्यावर सोपवलेले असेलतर त्यांनी कुठून पुरावे निर्माण करायचेते कोर्टात कसे सिध्द करायचेआताही *पवारांना राष्ट्रीय तपास यंत्रणेच्याविश्वासार्हतेची चिंता ग्रासते आहेपण बारावा स्फोट घडल्याचे बेधडक खोटे सांगताना पवारांना कधी आपल्या विश्वासार्हतेची चिंता वाटली होती काय?* पवारांचीच गोष्ट कशालाएकूण मागल्या दहा वर्षात यू.पी.म्हणून जो कारभार चालला होतातो किती विश्वासार्हहोताज्यामध्ये *इशरतसारख्या जिहादीलानिर्दोष ठरवण्यासाठी भारतीय गुप्तचर विभागाच्या वरिष्ठांना मारेकरी ठरवण्यापर्यंत मजल मारली गेली. *माजी पोलीस अधिकारी मुश्रीफ यांचे गाजलेले पुस्तक 'हू किल्ड करकरेविसरून चालेल कायकशासाठीकशाच्याआधारे हे पुस्तक लिहिले गेले?*

कसाबच्या हल्ल्यात अनेक पोलीस अधिकारी मारले गेलेत्या हत्याकांडात किडामुंगीप्रमाणे माणसे मारली गेल्याचे जगाने बघितलेपण *मुश्रीफ म्हणतातकरकरे यांना भारतीय गुप्तचर विभागाच्या मारेकऱ्यांनीच ठार मारलेह्यासारखा भयंकर विपर्यास असू शकतनाही.* करकरे यांना हिंदू दहशतवादी मानसिकतेने मारल्याचे दाखवून देण्याचा हा प्रयास आणि मालेगाव येथील स्फोटात कर्नल पुरोहित इत्यादींना गुंतवण्याचा डावएकाच कथेची उपकथानके नाहीत कायहे एकूण कारस्थान किती गूढ  गुंतागुंतीचे आहेत्याचा खुलासाव्हायला बराच काळ लागणार आहेमुश्रीफ यांचा भारतीय गुप्तचरांवरचा आरोप आणि त्याची डेव्हिड कोलमन हेडलीने केलेली सज्जता विसरून चालेल कायआपण मुंबई हल्ल्याची पूर्वतयारी करताना हल्लेखोर हिंदू वाटावेतयाचीही योजना केल्याचे हेडलीने सांगितलेआहे नात्यासाठी सिध्दिविनायक वा अन्य कुठल्या देवळापाशी मिळणारे भगव्या रंगातील मनगटाला बांधायचे दोरे हेडलीने खरेदी करून नेलेले होते नाम्हणजे करकरे ज्या हल्ल्यात मारले गेलेत्यातला कसाब पोलिसांच्या हाती जिवंत लागला नसतातर तो मुंबईहल्ला हिंदू दहशतवाद्यांनीच केला  पाकिस्तानचे फुकट नाव गोवले आहेअसा आरोप करण्याची संपूर्ण पटकथा सज्ज होतीमालेगावच्या हल्ल्यात साध्वी-पुरोहितांना गुंतवण्यापासून मुंबई हल्ल्यापर्यंतच्या घडामोडींमागे एक सूत्रबध्द नियोजन लपून राहत नाहीआपणअशा गोष्टी तुकडयांनी बघतो आणि विसरून जातोत्याचे परस्पर संबंध शोधायचा वा जुळवायचा प्रयत्नही करीत नाहीकिंबहुना अशा विविध घटनांचा परस्पर संबंध आपल्या लक्षात येऊ नये किंवा आपल्याला शंकाही येऊ नयेम्हणून ही कथानके तुकडयांनी आपल्या पुढेआणली जातातत्यातला काही भाग जाणीवपूर्वक लपवून ठेवला जातो. *म्हणूनच मालेगाव स्फोटातील आरोपीकरकरे यांचा तपासत्यांच्या हत्येचे बालंटमुश्रीफ यांचे पुस्तकपवारांची विविध विधानेहेडलीचा जबाब किंवा इशरत प्रकरणाचे धागेदोरे,* यांचा एकत्रितविचार करण्याची गरज असते.

पवार असोत किंवा सेक्युलर म्हणवून घेणारे बुध्दिमंत पत्रकार असोत - ते आपल्याला काय सांगत आहेतत्यापेक्षा काय लपवाछपवी करीत आहेतत्याचा वेध घेतल्यास सत्यापर्यंत पोहोचता येईलएकटया मालेगावचा विचार करून काहीही हाती लागणार नाही. *मालेगावप्रकरणातील सरकारी वकील रोहिणी सालियनयांचेच विधान आपण बघू शकतो. *काही महिन्यांपूर्वी त्यांनी सरकारचा आपल्यावर दबाव असल्याचे सांगितले होते.* मालेगाव खटल्यात धिम्या गतीने चालाअसे सरकारी अधिकाऱ्यांनी आदेश दिल्याचे त्यांनी म्हटले आहेत्याचा अर्थ कायया वकिलाने किती वेगाने हा खटला चालविला होतासाडेसात वर्षात ज्याच्या सुनावण्या होऊन कुठलाही निर्णय होऊ शकला नाहीअसा हा खटला आहेम्हणजे त्यात आधीच विलंब आणि वेळकाढूपणा म्हणावा इतकी धिमी गतीच होतीत्यालाधिमेपणाने चालवायचे म्हणजे कायबरेइतके सांगून त्यांनी वकीलपत्र सोडलेदरम्यान यातली कागदपत्रे आपल्याकडे तपास यंत्रणेने मागितलीपण ती आपल्याकडे नसल्याचे यंत्रणेला कळवल्याचेही सालियन म्हणतातमग ती कागदपत्रे कुठली आणि त्याशिवायखटला चालवला म्हणजे कायपण अशा बातम्या  माहिती सोयीनुसार पेश केली जाते आणि जनमानसात फक्त गोंधळ उडवला जातोआरोप करायचे आणि एक भ्रामक प्रतिमा उभ्या करायच्याअसा हा खेळ चालू असतोमग त्यातून मालेगावहिंदू दहशतवादसंघवादमनुवाद असे बॅन्ड शब्द बनवले जातातत्यांचा सररास वापर केला जातोलेबले म्हणून त्यांचा सरसकट वापर केला जातोआजवर कित्येक घटनांचे खटले चालले  त्यात अनेक घातपाशी शिक्षेला पात्र ठरलेत्यातून *इस्लामी दहशतवाद किंवा जिहादी घातपातअसे शब्द प्रचलित झालेपण हिंदू दहशतवादाची एकही घटना कुठेही सिध्द झालेली नाही की कोणाला गुन्हेगार म्हणून कोर्टाने शिक्षापात्र ठरवलेले नाहीपण तरीही गेल्या सहा-सात वर्षांत नुसत्या आरोपाच्या आतशबाजीने हिंदू दहशत हा शब्दप्रयोग लोकांच्या गळी मारलागेला आहेमालेगाव हा तसाच शब्द बनला आहे.

या खेळात फसलेल्या करकरेंना कोणी मारलेहा म्हणूनच कळीचा प्रश्न आहेमालेगाव प्रकरणाच्या तपासातली निरर्थकता पाहिलीतर करकरे खरेच *कसाब टोळीकडून मारले गेले की मालेगाव नाटकाच्या सूत्रधारांनी करकरे यांचा काटा पध्दतशीरपणे काढला,* असाहीप्रश्न निर्माण होतोआज ज्या गोष्टी बाहेर येत आहेतत्याकडे बघता जिवंत करकरे अशा लोकांसाठी धोका ठरला असता. *जसे इशरत प्रकरणात पिल्ले  मणी यांनी आज आपले तोंड उघडले आणि आपल्यावर खोटे प्रतिज्ञापत्र करण्यासाठी दबाव आणला गेल्याची कबुलीदिली आहे*, तसे करकरे यांनी केले नसते कायजे पुरावे नव्हते आणि जो गुन्हा घडलाच नव्हतात्यात निरपराधांना गोवण्यासाठी आपल्याला भाग पाडण्यात आलेअसे करकरे बोलण्याचा धोका कोणाला होतात्यांनीच करकरेंना संपवून हिंदुत्ववाद्यांवर त्यांच्या हत्येचेखापर फोडणे स्वाभाविक नाही कायजिवंत करकरे हिंदुत्ववाद्यांसाठी धोका नव्हतेतर सेक्युलर खोटेपणाला धोका होते नामग त्यांना कोणी मारले असेलहू किल्ड करकरेमालेगाव तपासातील हे सर्वात मोठे रहस्य आहेदाभोळकरपानसरे किंवा कलबुर्गी यांच्याहत्येचे धागेदोरे सापडत नाहीतपण त्याचेही खापर हिंदुत्ववाद्यांवर फोडणे सहजासहजी झालेले नाहीत्यामागे एक मोठी पटकथा रचलेली असणार.
*इशरत  मालेगाव प्रकरणाचा खुलासा हे हिमनगाचे टोक आहेअजून अशा पटकथेचे अनेक पदर उलगडायचे आहेतजेव्हा ती चित्रकथा पूर्ण होईलतेव्हा आजवर महानायक म्हणून वावरलेले मिरवलेले किती खलनायक विवस्त्र होतीलत्याचा अंदाजही करणे अवघडआहे.*  पुराणात मायावी राक्षसाच्या गोष्टी आहेतत्यात ते राक्षस रूप बदलून उजळमाथ्याने वावरताततसे किती *मायावी राक्षस आज आपल्या आसपास आहेतत्याची यादीच या निमित्ताने होऊ शकेल.* 

Comments

Popular posts from this blog

The Vanjari caste

शेतजमीन विषयक वहिवाट रस्ता

5 +3+3+4 school system explained