#तो_ऐतिहासिक_करार !!!

७ फेब्रुवारी १९३९ ! सारा बडोदा शोकसागरात बुडाला होता . लक्ष्मी विलास राजवाड्यावर मुंगीला पाउल ठेवता येणार नाही अशी गर्दी झाली होती . कारणच तसे होते . बडोद्याचे राजे सयाजीराव गायकवाड ह्यांचे आदल्याच दिवशी म्हणजे सहा तारखेला मुंबईत दुखःद निधन झाले होते . राजघराण्याच्या खाजगी स्मशानभूमीत " किर्तीमंदिरात " आज त्यांच्यावर अंतिम संस्कार होणार होते . 

राजाचे खाजगी सचिव विष्णुपंत नेने त्यावर जातीने लक्ष ठेऊन होते . त्याचवेळी त्यांना एक तार आली 

#Greatly_Grieved - #Adolf_Hitler !

विष्णुपंतांनी ती तार खिश्यात ठेऊन दिली . पण विष्णुपंतांना ती मिळण्याच्या अगोदरच ती पाठवणार्याच्या नावावरून साऱ्या बडोद्यात गोंधळ उडाला होता . पोस्ट ऑफिसमधून ती गोष्ट तत्काळ बडोद्याच्या जिल्हाधिकार्याला कळवण्यात आली होती . तिथून ती भारताच्या व्होईसरॉयला कळवण्यात आली आणि ती त्याने ब्रिटनच्या पंतप्रधानांच्या कानावर घातली . कारणच तसे होते ! जगाला दुसऱ्या महायुद्धाची चाहूल लागली होती . जर्मनीचा अडोल्फ हिटलर हा ब्रिटनचा शत्रू होता आणि सयाजीराव हे ब्रिटिशांचे मांडलिक होते . " आपल्या शत्रूने आपला दुसरा शत्रू मरण पावल्याबद्दल दुःख व्यक्त केले होते " हा ब्रिटीशांच्या दृष्टीने काळजीचा विषय होता . ब्रिटिशांनी ह्या तारेची चौकशी करण्यास सुरुवात केली . हाती नेमके काही लागत नव्हते . तेवढ्यात एक सप्टेंबरला दुसरे महायुद्ध सुरु झाले आणि ही चौकशी अर्धवट पडली .

का आली होती ती तार ? भारतीयांचा द्वेष करणाऱ्या हिटलरने एक भारतीय राजा , ब्रिटिशांचा मांडलिक मरण पावल्यावर का दुःख व्यक्त केले होते ? का हिटलरने " greatly " हा शब्द वापरला होता ? का ती तार विष्णुपंत नेने ह्यांच्या नावाने केली होती ? 

देतो ! सगळ्या प्रश्नांची उत्तरे देतो .

ही कथा तशी सुरु होते ती 1902 च्या अहमदाबाद काँग्रेस अधिवेशनापासून ! त्या निमित्ताने लोकमान्य टिळक आणि सयाजीराव प्रत्यक्ष भेटले होते . त्या दीर्घ चर्चेत लोकमान्यांनी " राजा म्हणून मिळालेल्या स्वातंत्र्याचा फायदा घेऊन परराष्ट्रात जाऊन ब्रिटिशांच्या शत्रूंशी संबंध प्रस्थापित करून भारताच्या स्वातंत्र्यलढ्यासाठी त्यांची मदत घ्या . लक्षात ठेवा आपल्या शत्रूचा शत्रू हा आपला मित्र असतो ". असा सल्ला दिला होता . त्याला अनुसरून सयाजीरावांनी आपले काम पुढे चालू ठेवले . 

हा सल्ला देण्यासाठी टिळकांनी सयाजीरावांची निवड का केली होती ? हा टिळकांचा सल्ला राजाने कसा आचरणात आणला ? 

सयाजीराव राजे असले तरी शिवछत्रपतींचे राज्य ब्रिटिशांनी ताब्यात घेतले आहे आणि आपण नामधारी राजे आहोत हे त्यांना व्यवस्थित माहीत होते . ब्रिटिशांचा स्वार्थ त्यांनी बरोबर ओळखला होता .
 ब्रिटिशांचे राज्य कधीच भारताच्या हितासाठी नाही हे त्यांना माहीत होते . भारताची ठराविक नेतेमंडळी ब्रिटिशांकडून कसे फायदे आणि सोयी लुटतात हे त्यांना दिसत होते . भारत स्वतंत्र करणे हेच त्यांचे ध्येय होते .

त्यांचे सगळे सल्लागार तसेच होते . बडोद्यात महर्षी अरविंद घोष ह्यांच्यासारखा ज्वालामुखी त्यांचा प्रमुख सल्लागार होता . सतत परदेशात फिरणारे " गैरहजर राजा " सयाजीराव ह्यांचे इंग्लंडमधील सल्लागार होते पंडित श्यामजी कृष्ण वर्मा आणि मादाम कामा ! आपले स्वीय सहाय्यक असलेल्या रियासतकार सरदेसाई ह्यांच्याकडून ते आपला इतिहास समजून घेत होते . पूर्वी चापेकर बंधूंशी संबंध असणाऱ्या सयाजीरावांचा नंतर सावरकर बंधूंशी संबंध होता तो आपले सहकारी माणिकराव ह्यांच्यामार्फत ! आपल्याच राजवाड्याच्या आवारात त्यांनी बॉम्ब बनवण्याचा कारखाना सुरु केला होता . राणी चिमणाबाई साहेब भरपूर खड्या भावाने सारखे दागिने विकत घेत आणि जवाहिरे बँकर बंधू ते पैसे क्रान्तिकारकांना पोचवत . मादाम कामा ह्यांना ठराविक पैसे सतत पाठवले जात .

थोडक्यात क्रान्तिकारी मार्गावर सयाजीरावांचा विश्वास होता . परदेशात निरनिराळ्या ठिकाणी मालमत्ता विकत घेवून ठेवणे सुरूच होते . राजाने नंतर फ्रेंच भाषा शिकणे सुरु केले होते . स्वित्झर्लंड मध्ये त्याला भारताचे Government in exile सुरु करायचे होते .
 पहिल्या महायुद्धाच्या वेळी त्याने , रासबिहारी बोस आणि लोकमान्य टिळक ह्यांनी मिळून एका सशक्त कार्यक्रमाद्वारे ब्रिटिशांचे राज्य उलथून टाकण्याचे ठरवले होते . असो . फितुरीमुळे ते फसले .

हे सर्व चालू असतांना 1931 साल उजाडले ! आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक संघटनेने 1936 मध्ये बर्लिन येथे भरणाऱ्या ऑलिम्पिक सामान्यांचे यजमानपद जर्मनीला देऊ केले होते . लवकरच सत्तेत आलेल्या हिटलरला खेळाची फारशी आवड नव्हती . जर्मनीचा पैसा वाया जाईल असे ऑलिम्पिक सामने जर्मनीत भरवायची त्याची इच्छा नव्हती . पण त्याचा सल्लागार गोबेल्स ह्याने " ह्या खेळांचा आपली नाझी विचारसरणी जगभर पसरवायला आणि नवी आंतरराष्ट्रीय नाती तयार करायला आणि आंतरराष्ट्रीय चलन गोळा करायला मदत होईल " असे हिटलरला समजून सांगितले . हिटलर त्याला तयार झाला . 

ही वार्ता सयाजीरावांना समजली . सयाजीरावांचे खाजगी मदतनीस विष्णुपंत नेने जर्मनीला पोहोचले . कोणीही ओळखीचे नव्हते . आणि प्रत्यक्ष हिटलरपर्यंत जायचे होते . त्या काळात " संस्कृत " बोलणे अभिरुची आणि विद्वत्तेचे लक्षण होते . त्यांनी संस्कृतमध्ये बोलायला सुरुवात केली व बोलण्यात " संस्कृत " हा शब्द आणला ! लवकरच त्यांची गाठ संस्कृत भाषेच्या तज्ज्ञ लोकांशी घालून देण्यात आली आणि तिथून त्यांनी लवकरच जर्मन सरकारच्या उच्चपदस्थ लोकांशी संपर्क साधला . जर्मनीत त्यावेळी सुरु असलेल्या " आर्य - अनार्य " वादाचा फटका त्यांना बसला का नाही ह्याबद्दल इतिहास मूक आहे . 

लवकरच नेन्यांनी काही कागदपत्रे तयार केलीत .

इकडे भारतात सयाजीरावांनी बर्लिन ऑलिम्पिकसाठी जर्मनीत जाऊ द्यावे असा अर्ज भारताच्या व्हॉइसरॉयकडे पाठवला . अमरावती येथील " हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाला " सयाजीरावांनी बर्लिन ऑलिम्पिकमध्ये जाण्यासाठी भरपूर आर्थिक मदत केली . अमरावतीची हनुमान व्यायाम प्रसारक मंडळी ही संस्था ऑलिम्पिक सामन्यांत बडोदा संस्थान तर्फे उतरली .

सयाजीराव बर्लिनला पोहोचले . 

1 ऑगस्ट 1936 रोजी उदघाटनाचा कार्यक्रम सुरु झाला . हिटलर , कार्यक्रमाचा मुख्य यजमान जिथे बसला होता त्या गच्चीच्या खालीच सयाजीरावांना मानाचे बसण्याचे स्थान देण्यात आले . संचलन सुरु झाले . प्रत्येक राष्ट्राचे खेळाडू आपल्या राष्ट्राचा ध्वज घेऊन मुख्य आयोजकाला मानवंदना देत होते . भारताचे खेळाडू युनियन जॅक हातात घेऊन आले . लवकरच भारतीय माणसांचा दुसरा संघ हातात " भगवा ध्वज " घेऊन पाहुण्यांना मानवंदना देऊ लागला . तो बडोदा संस्थानचा संघ होता आणि तो बडोद्याचा राष्ट्रीय ध्वज होता .( चौकोनी पण भगवा ) !
 सयाजीराजांवर लक्ष ठेवणारे ब्रिटिश गुप्तहेर चपापले .
 ही बातमी लगेच इंग्लंडला कळवण्यात आली .

पण त्यापेक्षा भयानक गोष्ट रात्री घडली ! हिटलरने रात्री सयाजीराव आणि त्यांच्याबरोबर आलेले सर्व खेळाडू ह्यांना शाही भोज दिला . आणि त्याच वेळी सयाजीराव आणि हिटलरने एका ऐतिहासिक करारावर स्वाक्षऱ्या केल्या . जगाचा राजा होऊ पाहण्रार्या एका माणसाने तोच ज्यांचा द्वेष करत होता त्या भारतीयांच्या एका राजाशी एक करार केला होता - बर्लिन बडोदा करार ! काय आणि कशाबद्दल होता तो करार ? 

सयाजीराजांनी फार पूर्वीच दुसरे महायुद्ध होणार असून त्यात जगाची उलथापालथ होणार आहे हे ओळखले होते . भारतीय राजांच्या संघटनेची कल्पना होती त्यांची ! हैदराबादच्या निजामानंतर दुसऱ्या क्रमांकाचा मान त्यांना होता . भारतातल्या काही राजांशी आणि नंतर त्यांनी एकमेकांशी बेटी व्यवहार करून सयाजीरावांना सर्व राजांना एकमेकांशी नात्याने जोडायचे होते . त्यांचा उपयोग मग भारतीय स्वातंत्रयलढ्यासाठी करायचा होता .

ह्या करारानुसार सयाजीरावांनी " दुसऱ्या महायुद्धात सर्व हिंदू राजे एक होऊन हिटलरला मदत करतील " असे वचन हिटलरला दिले होते . आणि त्याबदल्यात हिटलरच्या सेना भारताला स्वातंत्र्य मिळवून देतील , त्यांना ब्रिटीशांविरुद्ध लढायला मदत करतील असे वचन हिटलरकडून घेतले होते . 

पण काही वर्षातच दुसरे महायुद्ध सुरु व्हायच्या आधीच सयाजीरावांचे निधन झाले होते . त्यामुळे हा करार अस्तित्वात येऊ शकला नाही .

"दुर्दैव " हा शब्द भारतीयांच्या पाचवीला पूजला आहे .

#बडोदा #बर्लिन #भारत #जर्मनी #ऍडोल्फ_हिटलर #लोकमान्य_टिळक #सावरकर #ब्रिटिश #चापेकर #अरविंद_घोष #मादाम_कामा #शामजी_कृष्ण_वर्मा #बडोदा_बर्लिन_पॅक्ट #दुसरे_महायुद्ध #ऑलिम्पिक

#इतिहास #रियासतकार_सरदेसाई
Vishnu Pant Nene is Father of Dr. Damodar Vishnu Nene, residing at Raopura, Baroda and my grand father.

Comments

Popular posts from this blog

The Vanjari caste

शेतजमीन विषयक वहिवाट रस्ता

5 +3+3+4 school system explained