माझ्या दलित मित्रांना व इतर समाजातील तरूणांना कळकळीचे आवाहन:

माझ्या दलित मित्रांना व इतर समाजातील तरूणांना कळकळीचे आवाहन:
माझ्या भावांनो आणि भगिनींनो,
नमस्कार.
भीमा कोरेगाव प्रकरण घडून २०० वर्षे झाली. जे तेव्हा घडले त्यावरून आता मांडण्यात काय अर्थ आहे?
जरा विचार करा की तुमच्या so called नेते मंडळींनी आज पर्यंत तुम्हाला काय दिले?
त्यांचा चिथवण्यावर तुम्ही भांडता, लढता, आंदोलन करता, स्वत: च्या अंगावर केसेस घेता. आपल्या आयुष्याची राखरांगोळी करता.
तुमचे नेते गडगंज श्रीमंत झालेत, महागड्या गाड्यातून फिरतात आणि तुम्ही अजून फक्त भांडत बसतात, भुर्जी पाव खात दिवस काढता.
ते झाले करोड पती आणि तुम्ही अजून रोड पती - रस्त्यावर.
बाबासाहेबांनी आपल्या काय शिकावले आहे ते लक्षात ठेवा : वाचाल तर वाचाल.
बाबासाहेबांनी कधीच हिंसाचार शिकवला नाही.
बाबासाहेबांनी कधीच दुसऱ्या समाजाविरुद्ध द्वेष करायला सांगितले नाही.
तुमचे आजचे फडतूस नेते तुम्हाला चुकीच्या रस्त्यावर नेण्याचा प्रयत्न करीत आहेत.
या नेत्यांना केवळ तुमच्या जीवावर स्वत:ला गडगंज संपत्ती जमवायची आहे.
हे नेते तुम्हाला दुसऱ्या समाजाविरुद्ध, दुसऱ्या पक्षांविरूद्ध लढवतात पण स्वत: मात्र त्यांच्या नेत्यांबरोबर छुपी मैत्री, छुप्या partnerships, छुपे धंदे करत असतात.
अशा फालतू नेत्यांना गाडून टाका.
अशा नेत्यांनी बंगले बांधले आहेत जेव्हा तुम्हाला साध घर ही नशीब नाही. आणि तुम्ही समाधानी आहात की हे तुमच्या झोपड्यांना protection देतात.
हे फडतूस नेते बाबासाहेबांनी दिलेल्या आदर्शा विरूद्ध काम करतात.
तेव्हा जागे व्हा. केवळ बाबासाहेबांनी दिलेल्या आदर्शा चे पालन करा.
शिका. मोठे व्हा. आपल्या समाजाला योग्य दिशा तुम्ही द्या..
फडतूस नेत्यांना गाडून टाका.
आजच्या आधुनिक युगात लोक जात पात विसरत आहेत - मानत नाहीत. तेव्हा फडतूस राजकारण करत असणार्या नेते मंडळींना फेकून द्या.
बना तुम्ही नव्या भारताचे नेते.
(वरील पोस्ट सर्व समाजातील भरकटत चाललेल्या तरूणांना उद्देशून आहे..).

Comments

Popular posts from this blog

The Vanjari caste

शेतजमीन विषयक वहिवाट रस्ता

5 +3+3+4 school system explained