*छत्रपती आणि सर्वधर्मसमभाव*

आजकाल शिवाजी महाराज कसे सर्वधर्मसमभाव मानत होते, असे खोटे विचार पसरवणारे विचारजंत गावोगावी भाषणबाजी करताना दिसतात. 

राजकीय नेतेमंडळी देखील काहीही अभ्यास न करता त्याचीच री ओढतात. परंतु शिवचरित्राच्या अस्सल साधनांचा बारकाईने अभ्यास केल्यास हे सर्व किती चुकीचे आहे हे ध्यानांत येते. म्हणूनच *"शिवाजी महाराज हिंदू धर्मरक्षणासाठीच लढले."* हे संदर्भ पटण्यासाठी आजची सदर आपण सुरु करत आहोत.


*छत्रपती आणि सर्वधर्मसमभाव*

*भाग - १*

छत्रपती शिवरायांच्या हिंदवी स्वराज्याचा झेंडा रंगीबेरंगी नव्हता तर दोन पताक्याचा निखळ भगवा झेंडा होता. हाच भगवा ध्वज प्रभु श्रीराम आणि भगवान श्रीकृष्ण यांच्या काळापासून प्रचलित आहे. हवे असल्यास पुराण वाचू शकता.

छत्रपतींनी बळजबरीने मुसलमान झालेल्या बजाजी निंबाळकरांना आणि नेतोजी पालकरांना पुन्हा स्वराज्यात घेऊन हिंदू केले. घरवापसीचे आद्य पुरस्कर्ते छत्रपती शिवरायच आहेत. जर महाराज सर्व धर्म समान मानत असते तर असे शुद्धिकरण करायची काय गरज होती ?

शाईस्ताखानावर लालमहालात हल्ला केला तो रमजानचा महीना आणि सहावा रोझा होता. जर फालतू सर्वधर्मसमभाव मानत असते तर असे केले असते का ?

कोणताही पुरावा नसताना शिवरायांच्या सैन्यात ५७% मुस्लिम सांगतात. हीच मुळात शुद्ध थाप आहे. 

पुढील भागांत परमानंद रचित शिवभारतातील काही अध्याय आणि त्यांचा अर्थ पाहूया.

*भाग - २*

शिवाजी महाराजांचे समकालीन आणि महाराजांचे निकटवर्तीय कवींद्र परमानंद आपल्या शिवभारत संस्कृत ग्रंथात अठराव्या अध्याय आणि श्लोक क्र ५१ मध्ये लिहितात....

*त्वया गृहीत्वा कल्याणं तथा भीमपुरी यथा।*
*यावनानां महासिद्धीनिलयाः किल पातीतः।।*

छत्रपतींनी कल्याण आणि भिवंडी येथे मशिदी पाडल्याचा उल्लेख या श्लोकांत आहे.

शिवभारताच्या पहिल्याच अध्यायात श्लोक क्र ३१ मध्ये परमानंद लिहितात...

*प्रपन्नानां परित्राता प्रजानां हितकारकाः।*
*देवद्विजगवांगोप्तः दुर्दांत यवनांतकः।।*

"दुर्दांत यवनांतक" हा शब्दच सर्व काही स्पष्ट करणारा आहे. छत्रपती शिवराय हे देव, ब्राह्मण (पूजा करणारा हा अर्थ अपेक्षित) आणि गायींचे संरक्षक असून यवनांचा अंत करणारे आहेत असा या श्लोकाचा सरळ सरळ अर्थ आहे.

हे लिहिणारे कवींद्र परमानंद हे छत्रपतींचे आद्य चरित्रकार आहेत. त्यांनी शिवाजी महाराजांच्या हयातीतच आणि महाराजांच्याच आदेशाने शिवभारत नावाचा ग्रंथ लिहिला आहे. हा ग्रंथ शिवचरित्राचे एक अस्सल प्रमाण म्हणून मानला जातो. या ग्रंथात आलेले वरील उल्लेख महाराजांचे धोरण स्पष्ट करणारे आहे.

कवीन्द्र परमानंद आपल्या शिवभारतात महाराजांना *म्लेंच्छक्षयदीक्षित* असे विशेषण वापरतात. "म्लेंच्छक्षयदीक्षित" म्हणजे मुसलमानांचा सर्वनाश करण्याची दीक्षा घेतलेला ! विशेष म्हणजे या कवींद्र परमानंदांचा शिवाजी महाराजांनी हत्तीचा मान देऊन सत्कार केला आहे. हा सत्कार म्हणजे एका अर्थाने त्यांच्या लिखाणाचा केलेला गौरवच आहे. 

*भाग - ३*

छत्रपती शिवराय १६७८-७९ मध्ये दक्षिण दिग्विजयासाठी गेले. याविषयी आपण बरीच माहिती आपल्या समूहावर घेतलेली आहेच. तिथे सध्याच्या तामिळनाडू प्रांतातील तिरुवन्नमलई येथे शोणाचलपतीचे देवालय पाडून त्या स्थानी मशीद बांधण्यात आली होती. ही गोष्ट महाराजांच्या ध्यानी येताच त्यांनी मशीद पाडून देवालय पूर्ववत बांधण्याची आज्ञा आपल्या सहकाऱ्यांना केली आणि त्या स्थानी भगवान शंकराचे देवालय आणि गोपूर पुनर्स्थापित केले. हे सत्य स्पष्टपणे कथन करणारा शिलालेखच त्या मंदिरावर कोरलेला आहे. छत्रपतींना सर्वधर्मसमभाव या गोटात सहभागी करणाऱ्या कथित महाभागांस महाराजांचे हे वर्तन कितपत मान्य होईल या बद्दल शंकाच आहे कारण इतिहासाची मोडतोड करून आपला बुद्धीभेद करण्यासाठी हि लोक सरसावली आहेत. 

छत्रपती शिवरायांनी राज्याभिषेकाच्या वेळी राज्यव्यवहारातून उर्दू, अरबी आणि फारसी शब्दांचे पूर्णतः उच्चाटन करून संस्कृतप्रचुर प्राकृत भाषेत राज्यव्यवहार सुरु केला. त्यासाठी रघुनाथपंत हणमंते यांच्या करवी *राज्यव्यवहारकोश* सिद्ध केला. यवनी भाषेतील शब्द सुद्धा आपण वापरता कामा नये अशी टोकाची भूमिका घेणारे स्वभाषाभिमानी छत्रपती कथित पुरोगाम्यांस मान्य होतील काय?

शिवछत्रपतींच्या अनेक अस्सल कागदपत्रांत हिंदवी स्वराज्य असा स्पष्ट उल्लेख पहायला मिळतो. "हिंदवी स्वराज्य" म्हणजेच हिंदुंचे स्वराज्य ! संभाजी महाराजांनी तर पुढील काळांत व्याकरणातील चूक सुधारून "हैन्दवी स्वराज्य" असा जाणीवपूर्वक उल्लेख केलेला आहे. संभाजी महाराज संस्कृत भाषेचे मोठेच जाणकार असल्याने हे स्वाभाविक आहे.


Comments

Popular posts from this blog

The Vanjari caste

शेतजमीन विषयक वहिवाट रस्ता

5 +3+3+4 school system explained